सत्य शोधक संस्कृती आणि संशोधन भारतीयसत्य शोधक या नावाखाली कित्येकांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर विचार,तत्व आणि सिद्धांत मांडले परंतु त्यांनी मांडलेले सिद्धांत सत्यच आहेत हे सिद्ध होऊ शकले नाहीत त्यांनी आपले मत व्यक्त करण्याचा मार्ग निवडला आणि तो जगाला पटउन सागण्याचा प्रयत्न केला उदा:देव आहे काय ? याचे उत्तर देतांना होय,नाही आहेतर कोठे आहे .माणूस ,आत्मा मूर्ती,नीर्गुण,सगुण,शक्ती अशा अनेक प्रकारची उत्तरे मिळतात त्यात सत्य काय आहे हे शोधण्या ऎवजी आपले मत समाजावर लादण्याचा आटोकाट प्रयत्न गेला .जसे अंधश्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा आणि डोळस श्रद्धा असे दोन भाग झालेत आणि त्यवर तत्व व सिद्धांताचे मनोरे उभे केले वस्तुत: श्रद्धा हि आंधळीच असते. डोळस श्रद्धा असूच शकत नाहीज्याप्रमाणेअंधश्रद्धा हा शब्द वापरात येतो तसाच डोळस श्रद्धा हा शब्द वापरात येत नाही तो शब्द अस्तित्त्वातच नाही तरीही यांनी वांझेच्या पुत्राचे बारसे केलेच दुस-या एका संशोधन काराने सांगितले कि ज्ञानेश्वर महाराज झालेच नाही कारण ज्ञानेश्वर महाराज हे एक आहेत कि तीन आहे हे कळतच नाही त्यने ज्ञानेश्वर महाराजाच्या ज्ञानेश्वरी व अभंगाच्या